औरंगाबाद जिल्ह्यात 42374 कोरोनामुक्त, 709 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 104 जणांना (मनपा 92, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42374 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44250 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1167 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 709 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे

मनपा (47) एन-2 सिडको (1), हरिप्रसाद नगर (1), होनाजी नगर (1), न्यू उस्मानपुरा (1), एन-3 सिडको (4), समर्थ नगर (3), खडकेश्वर (1), सहकार नगर (2), बीड बायपास (1), छावणी परिसर (1), जयभवानी नगर (1), खिंवसरा पार्क (1), रेल्वे स्टेशन परिसर (2), एमजीएम परिसर (1), इटखेडा (1), हर्सुल टी पॉइंट (3), राजेश नगर, बीड बायपास (1), सुराणा नगर (1), गारखेडा परिसर (1), बनेवाडी (2), साई मेडिसिटी हॉस्पीटल परिसर (1), अन्य (16)

ग्रामीण (23) शहापूर, घोडेगाव (1), ए.एस. क्लब जवळ, तिसगाव (1),अन्य (21)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात म्हाडा कॉलनी, देवानगरी येथील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.