औरंगाबाद जिल्ह्यात 126 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 39558 कोरोनामुक्त, 671 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 127 जणांना (मनपा 99, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39558 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 126 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41338 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1109 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (106) पडेगाव (3), देवानगरी (1), एन सहा सिडको (1), हर्सुल (2), जाधववाडी (1), भगतसिंग नगर (3), मल्हार चौक, गारखेडा परिसर (1), मंजुरपुरा, लोटाकारंजा (2), न्यू बालाजी नगर (1), हुसेन नगर (1), टिळक नगर (1), सौजन्य नगर (1), सावित्री नगर (1), साई नगर (1), रायगड नगर (1), शिवेश्वर कॉलनी (1), टेलिकॉम सो (1), पारिजात सो. बजाज नगर (1), साई परिसर (1), एसआरपीएफ कॅम्प परिसर (14), कांचनवाडी (1), नाथ पोदार सो. (2), घाटी परिसर (3), ज्योती नगर (1), भानुदास नगर (1), देशमुख नगर (1), बळीराम शाळा परिसर (1), भक्ती कंन्स्ट्रक्शन (1), केंब्रिज शाळा परिसर (1), राज नगर (1), केशरसिंगपुरा (2),कासलीवाल तारांगण (1), बीड बायपास (1), इटखेडा (1), एन सात सिडको (1), नारळीबाग परिसर (1), एन वन (2), न्यू नंदनवन कॉलनी (1), जाधववाडी (1), व्यंकटेश नगर (1), एसबीएच कॉलनी (1), अन्य (41)

ग्रामीण (20) शिवाजी नगर (1), बजाज नगर (3), जय जनार्दन सो., बजाज नगर (1), वैजापूर (1), गंगापूर (2), फुलंब्री (1), कन्नड (1), अन्य (10)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत चिकलठाणा परिसरातील 77 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.