औरंगाबाद जिल्ह्यात 35 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 38 कोरोनामुक्त, 305 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,१४जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 29 जणांना (मनपा 17, ग्रामीण 12) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 38 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 35 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 806 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 463 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 305 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा (10) गारखेडा 1, एन-6 येथे 4, अन्य 5
ग्रामीण (25) औरंगाबाद 1, गंगापूर 4, कन्नड 2, सिल्लोड 1, वैजापूर 9, पैठण 8  

मृत्यू (02)

घाटी (02) 1.     60,स्त्री,चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद2.    80, स्त्री, म्हस्की, वैजापूर, औरंगाबाद