औरंगाबाद जिल्ह्यात 44878 कोरोनामुक्त, 333 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 55 जणांना (मनपा 47, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44878 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 36 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46434 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1223 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (32)उल्कानगरी (2), नाथपुरम (2), सातारा परिसर (1), शहागंज (1), पांडव कॉर्नर (1), एन-9 सिडको (1), एन-7 पोलीस स्टेशन (1), एन-6 सिडको (1), रंगार गल्ली (1), सातारा परिसर (1), पदमपुरा (1), उस्मानपुरा (1), बीडबायपास (2), बजाज नगर (1), अन्य (15)

ग्रामीण (04) नागद (1), फुलंब्री (1), अन्य (02)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.