औरंगाबाद जिल्ह्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44070 कोरोनामुक्त, 486 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 02 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 57 जणांना (मनपा 42, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44070 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 76 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45762 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1206 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 486 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (69)धूत हॉस्पीटल परिसर (2), जटवाडा रोड (2), एन सात (1), अरिहंत नगर (1), एन चार (1), अविष्कार कॉलनी (1), सावंगीकर हॉस्पीटल जवळ (1), एन नऊ (1), स्नेह नगर (2), मुकुंदवाडी (1), उत्तरानगरी (1), एसबीआय मुख्यालय परिसर (2), शाह नगर (1), भावसिंगपुरा (1), बीड बायपास (2), समर्थ नगर (2), इटखेडा (1), केंद्रीय विद्यालय, नगर नाका परिसर (1), कांचनवाडी (1), एन अकरा, गजानन नगर (1), पडेगाव (1), सेंट्रल नाका (1), अन्य (41)

ग्रामीण (07)लासूर सावंगी (1), पैठण (1), कन्नड (1), अन्य (4)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगरातील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.