औरंगाबाद जिल्ह्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 45438 कोरोनामुक्त, 125 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 25 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 48 जणांना (मनपा 40, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45438 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46795 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1232 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (28)

            छत्रपती चौक, बजाजनगर (1), गणेश नगर, सिडको (1),विठ्ठल रुक्मीणी मंदीर परीसर(1), ब्रिजवाडी (1), उत्तरा नगरी (1),  विजय नगर (1), भारतमाता नगर (1),  ज्योती नगर (1),  उल्कानगरी (1),  बीडबाय पास (2),अन्य (17),   

ग्रामीण (4)

खामगाव, फुलंब्री (1), अन्य (3)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सिडको कॉलनीतील 66 आणि कन्नड तालुक्यातील जामडी येथील 56 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.