औरंगाबाद जिल्ह्यात 82 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44013 कोरोनामुक्त, 468 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 1 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 70 जणांना (मनपा 63, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44013 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 82 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45686 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1205 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 468 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (65)मयूर पार्क (1), उस्मानपुरा (1), रामा इंटरनॅशनल परिसर (1), जय विश्वभारती कॉलनी (1), छत्रपती नगर (1), सनी सेंटर (1), एन सात (6), एन सहा (1), शिक्षक कॉलनी (1), राजा बाजार (3), स्नेह नगर (1), बन्सीलाल नगर (1), बीड बायपास (1), आकाशवाणी परिसर (1), शहा नगर (2), सुरेवाडी (1), विवेकानंद नगर (2), अन्य (39)

ग्रामीण (17)तिसगाव (1), गवळी धानोरा (1), बजाज नगर (3), रांजणगाव (1) अन्य (11)