औरंगाबाद जिल्ह्यात 116 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 41176 कोरोनामुक्त, 979 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 29 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 67 जणांना (मनपा 46, ग्रामीण 21) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41176 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 116 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43300 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1145 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 979 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (92) एन-7 सिडको (1), मनीषा कॉलनी,अदालत रोड (1), मिटमिटा (4), नागेश्वर वाडी (1), एन-9 सिडको (5), औरंगपुरा (1),कासलीवाल सुवर्णयोग (1), सिडको एन-4 (3), छावणी (1), खडकेश्वर (3), रेल्वे स्टेशन परिसर (4), गोलवाडी (1), पैठण रोड (2), अविष्कार सोसायटी (1), एन-11 सिडको (1), एस.बी.आय. क्वॉर्टर (1), नवजीवन कॉलनी, हडको (1), हर्सूल सावंगी (2), जयभवानी नगर (1), विश्रांती नगरी (1), पिसादेवी (2), बालाजी नगर (1), एन-3 सिडको (1), स्वप्ननगरी (1), विद्यानगर (1), फुलेनगर (2), ज्योती नगर (1), उल्कानगरी (1), गारखेडा परिसर (1), देवानगरी (1), पडेगाव (1), अजब नगर (1), अन्य (42)

ग्रामीण (24) पैठण (1), वडगाव काल्हाटी (1), चिंचोली (1), सिडको महानगर (1), बजाज नगर (1), अन्य (19)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील 90 वर्षीय पुरूष आणि नवजीवन कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.