महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

मुंबई, दि. २९ : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.

परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या-ज्या गोष्टींसाठी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे, त्या कायम राहतील.