औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 95 कोरोनामुक्त, 153 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 17 जणांना (मनपा 06, ग्रामीण 11 ) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45  हजार 95 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 832 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 584 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 153 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (03)

घाटी  परिसर 1, पद्मपुरा 1, अन्य 1

ग्रामीण (09)

गंगापूर 2, वैजापूर 5, पैठण 2  

मृत्यू (02)

घाटी (01)

1.      40, पुरुष, विष्णू नगर, औरंगाबाद

खासगी (01)

1.      57 पुरुष, शहा बाजार, औरंगाबाद