औरंगाबाद जिल्ह्यात 55 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,चार मृत्यू

जिल्ह्यात 39905 कोरोनामुक्त, 574 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 15 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 65 जणांना (मनपा 44, ग्रामीण 21) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39905 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 55 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41597 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1118 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 574 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (46) बेगमपुरा (1), व्यंकटेश नगर (2), शिवाजी नगर (1), श्रेय नगर (1), मार्ड हॉस्टेल (2), हरिकृष्ण नगर (1), न्यू नंदनवन कॉलनी (1), आदित्य नगर (1), नाथ नगर (1), बीड बायपास (2), भाग्य नगर (1), जालन नगर (2), एन बारा सिद्धार्थ नगर (2), पिसादेवी रोड (1), उल्कानगरी (1), अन्य (26)

ग्रामीण (9) पैठण (1), कन्नड (3), शिव नगर कन्नड (1), वाहेगाव, गंगापूर (2), वैजापूर (1), महालगाव, गंगापूर (1),

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत भारत नगर येथील 72 वर्षीय पुरुष, कैलास नगरातील 75 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात उत्तरा नगरीतील 49 वर्षीय पुरुष, हर्सूल येथील 42 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.