औरंगाबाद जिल्ह्यात 25 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 427 कोरोनामुक्त, 532 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,४ जुलै /प्रतिनिधी:-औरंगाबाद जिल्ह्यात आज 96 जणांना (मनपा 13, ग्रामीण 83) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 427 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 25 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 399 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 440 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 532 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (11) पडेगाव 1, टाऊन हॉल सिडको 1, हर्सूल 1, घाटी 1, गारखेडा 2, शहानूरवाडी 1, इटखेडा 1, अन्य 3

ग्रामीण (14)औरंगाबाद 1, फुलंब्री 1, गंगापूर 1, कन्नड 2, खुलताबाद 1, वैजापूर 3, पैठण 5

मृत्यू (03)

घाटी (03) 1. पुरुष/50/म्हस्की, वैजापूर2. स्त्री/67/गारखेडा, औरंगाबाद3. स्त्री/80/किनगाव, फुलंब्री