औरंगाबाद जिल्ह्यात 44408 कोरोनामुक्त,473 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 07 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 66 जणांना (मनपा 61, ग्रामीण 05) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44408 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 62 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46093 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1212 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (46)शिवाजी नगर (1),बीड बाय पास (3),न्यू हनुमान नगर (1),ज्योती नगर (1), जाधववाडी हर्सूल (1), कांचनवाडी (2), पदमपुरा (1), पानदरीबा (1), उत्तम नगर (1),सह्याद्री हिल्स (2), एस.बी कॉलनी (1), उल्का नगरी (2),उस्मानपुरा (1),एसबीएच कॉलनी (1),हडको (1), कुशल नगर (1), श्रीनिकेतन कॉलनी (2), अंबिका नगर (2), व्यकटेश नगर (1),एन-8 सिडको (1), एन-8 गजराज सो. (1), अन्य (18)

ग्रामीण (16)रांजणगाव (1), शिवराई, कन्नड (1), अन्य (14)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत पिंप्री राजा, औरंगाबाद येथील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.