औरंगाबाद जिल्ह्यात 62 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,दोन मृत्यू

जिल्ह्यात 43103 कोरोनामुक्त, 565 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 19 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 58 जणांना (मनपा 45, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43103 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 62 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44851 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1183 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (51)शिवाजी नगर (1), जाधववाडी (1), हर्सुल सावंगी (1), कामगार चौक (1), संत तुकाराम नगर (1), सेव्हन हिल (2), बेगमपुरा (1), सौजन्य नगर (1), सद्गुरू नगर (1), कांचनवाडी (2), उत्तरानगरी (2), हनुमान नगर (1), ज्योती नगर (1), नारायण नगर (1), एन सात सिडको (3), एन नऊ एल सेक्टर (1), एन वन सिडको (1), सारा परिवर्तन हर्सुल (1), पद्मपुरा (1), देवानगरी (1), पुंडलिक नगर (1), मिलिंद नगर (1), छत्रपती नगर (1), देवळाई चौक (1), वेदांत नगर (2), जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर (1), गादिया विहार (1), सारा परिवर्तन, हर्सुल (1), संत ज्ञानेश्वर कॉलनी (1) अन्य (14), बन्सीलाल नगर (1), एन दोन सिडको (1)

ग्रामीण (11)पानवडोद, सिल्लोड (1), यशवंत नगर, पैठण (1), साई सिद्धार्थ सिडको महानगर (1), अन्य (8)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सिल्लोड तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात अरीश कॉलनीतील 56 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.