औरंगाबाद जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 41508 कोरोनामुक्त, 995 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 03 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 84 जणांना (मनपा 69, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41508 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 84 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43656 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1153 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 995 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (69)दर्गा चौक (1), पुंडलिक नगर, गारखेडा (2), आलोक नगर (1), प्रताप नगर (1), सातारा परिसर (2), पोलिस लाईन (1), चिकलठाणा (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), माळीवाडा (1), आकाशवाणी परिसर (6), एसआरपीएफ कॅम्प (2),एन नऊ, रायगड नगर (1) एन आठ (6), एन सात सिडको (3), हर्सुल (1), चेतना नगर (2), गवळीपुरा (1), समर्थ नगर (1), एन नऊ, श्रीकृष्ण नगर (1), अमृतसाई सारा, कांचनवाडी (1), गजानन कॉलनी (1), कांचनवाडी, कल्याण गेट (1), बीड बायपास (1), दशमेश नगर (1), ज्योती नगर (1), मुकुंदवाडी (1), हनुमान नगर (2), कामगार चौक (1), पडेगाव (1), बिल्डर सो., नंदनवन कॉलनी (1), अन्य (22)

ग्रामीण (15) तिसगाव महानगर (1), गांधेली (1), चौका, फुलंब्री (2), रांजणगाव (2), पळसखेडा (1) कुक्कडगाव (1), बिडकीन (1), अन्य (6)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शिवना येथील 59 वर्षीय पुरूष, काझीवाडा येथील 58 वर्षीय स्त्री आणि चिकलठाणा येथील हनुमान चौक 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.