औरंगाबाद जिल्ह्यात 99 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,पाच मृत्यू

जिल्ह्यात 35628 कोरोनामुक्त, 973 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 27 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 154 जणांना (मनपा 76, ग्रामीण 78) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 35628 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 99 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37664 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1063 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 973 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 41 आणि ग्रामीण भागात 12 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (31) एन दोन सिडको (1), राम नगर (1), चिकलठाणा (1), सातारा परिसर (1), म्हसोबा नगर (1), गोलवाडी (1), जसवंतपुरा, सेंट्रल नाका रोड (1), सहकार नगर (1), आदित्य हॉस्पीटल पसिसर (1), विश्वनगरी, सातारा परिसर (1), सातारा पोलिस स्टेशन परिसर (1), टाऊन सेंटर, एन वन (1), उस्मानपुरा (1), एन अकरा, गजानन नगर (1), नक्षत्रवाडी (1), गारखेडा परिसर (1), अरिहंत नगर (1), एन तीन सिडको (1), बंजारा कॉलनी (2), बालाजी नगर (1), शिवाजी नगर (1), जय भवानी नगर (1), निराला बाजार (2), पीर बाजार (1), न्यू हनुमान नगर (1), एन नऊ हडको (1), बीड बायपास (1), अन्य (2)

ग्रामीण (27) गंगापूर (1), कन्नड (4), खुलताबाद (1), सिल्लोड (3), वैजापूर (3), वाळूज (1), पंढरपूर (3), पवन नगर, रांजणगाव (1), एमआयडीसी पोलिस स्टेशन परिसर, बजाज नगर (1), अंतापूर (2), लासूर स्टेशन (1), लाखणी, मनूर, वैजापूर (4), महालगाव, गंगापूर (1), पैठण (1),

पाच कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत वाळूज येथील 72 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात समर्थ नगरातील 76 वर्षीय स्त्री, रंगार गल्लीतील 35 वर्षीय पुरूष, गारखेडा परिसरातील 58 वर्षीय पुरूष, चिकलठाणा येथील 64 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.