जिल्हा परिषद – पंचायत समितीची प्रभाग रचना पूर्वीचीच राहणार

गट आणि गणाची आरक्षण सोडत नव्याने काढण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश
वैजापूर,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जालना जिल्हा परिषदेसह राज्यातील 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मागील आठवड्यात काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले आहेत.

दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिकांच्या निवडणुका पूर्वी प्रमाणेच घेण्याचा निर्णय घेतला होता.या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज शुक्रवारी सदर आदेश निर्गमित केले आहे.या आदेशामुळे पूर्वीचीच प्रभाग रचना कायम राहणार असून आरक्षण सोडत मात्र नव्याने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.