औरंगाबाद जिल्ह्यात 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
जिल्ह्यात 5229 कोरोनामुक्त, 3227 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि. 13 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 जणांना (मनपा 122 , ग्रामीण 46 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 295, ग्रामीण 55) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8814 झाली आहे. आजपर्यंत एकूण 358 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3227 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 164 रुग्णांची वाढ झाली आहे.
यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 91 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 30 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 61 रुग्ण आढळलेले आहेत. सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत एन सहा सिडकोतील 49 वर्षीय पुरूष, छावणीतील 76 वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात 45 वर्षीय स्त्री असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.