औरंगाबाद जिल्ह्यात 31 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 220 कोरोनामुक्त, 279 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद,१८ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 279 जणांना (मनपा 17, ग्रामीण 45) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 220 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 972 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 473 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (12)
भावसिंगपुरा (1), कैलास नगर (1), संजिवनी कॉलनी (1), अन्य (9)
ग्रामीण (19)
गंगापूर (2), कन्नड (2), सिल्लोड (2), वैजापूर (10), पैठण (3)
मृत्यू (02)
घाटी (02) 1. 66, पुरूष, वैजापूर2. 78, पुरूष, बंजारा कॉलनी