वैजापूर येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वैजापूर,१८ जुलै /प्रतिनिधी :-साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पूर्णाकृती पूतळ्याच्या नियोजित जागेवर अभिवादन करण्यात आले. “साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवे. त्यात आपल्या वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब दिसायला हवे” असे स्पष्ट विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करण्याची  आज गरज आहे. असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी यावेळी बोलतांना केले.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष हाजी शेख अकिल, पोलीस निरीक्षक शामसुंदर कोटाळे, माजी नगरसेवक दशरथ बनकर, समता परीषदेचे पूडंलीक गायकवाड, सोनू भाऊ राजपुत, एमआयएम चे तालुकाध्यक्ष अकील कूरैशी, अल्ताफ बाबा,धर्मेंद्र त्रिभुवन, पगारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.