बिलोणी येथील शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथील 65 वर्षीय शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (ता.06) सकाळी उघडकीस आला. सिताराम भिकाजी कदम असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नांव आहे. शेतातील पीक लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने त्या नैराश्यातून त्यांनी मृत्युला कवटाळले असल्याची चर्चा आहे. 

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.