वैजापूर उपविभागीय कार्यालयावर वंचित आघाडीचा आज जनआक्रोश मोर्चा

वैजापूर ,१८ जून/ प्रतिनिधी :-  राज्यात दलित व मुस्लिम समाजातील नांदेड येथील अक्षय भालेराव, शहिद झरीन खान  (परळी, जिल्हा बीड), शबाना पटेल (कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर) ,गिरीधर तपाले (ता. रेणापूर जि. लातूर) ,हिना मेश्राम (अकोला) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी (ता.19) वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी युवक व शहर, सकल आंबेडकरी समाज वैजापूर शहर व ग्रामीण यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे गौतम जाधव, भैय्या पठारे, पिंटू भोसले यांनी दिली. 

राज्यातील वेगवेगळया जिल्ह्यात अल्पसंख्याक व दलित समाज घटकांतील युवकांची जातीय भावनेतून  निर्घृण हत्या होत असल्यामुळे या समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.पिडित कुंटुबातील युवकांची हत्या झाल्यामुळे या परिवाराला न्याय देण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील हजारो भीमसौनिक आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.