अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पदचाऱ्याचा मृत्यू ; वैजापूर – खंडाळा रस्त्यावरील घटना

वैजापूर,८ एप्रिल  /प्रतिनिधी :-अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.7) मध्यरात्री औरंगाबाद रस्त्यावर घडली. सतीश विश्वनाथ मतसागर (वय 25, रा. जरुळ) असे मृताचे नाव आहे. याबाबत मृताचा भाऊ गणेश मतसागर यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

सतीश हा भाऊ गणेश व अन्य कुटुंबियांसह जरुळ येथे राहत होता. गुरुवारी रात्री तो साईनाथ मतसागर यांच्या शेतात साईबाबांच्या दिंडी निमित्त जेवणाचा कार्यक्रम असल्याने तेथे गेला होता. जेवण केल्यानंतर पोल्ट्री फार्म येथे जेवणासाठी जातो असे सांगून सतीश बाहेर गेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोल्ट्री फार्मवर आढळून आला नाही. वैजापूर खंडाळा रस्त्यावरील एका हॉटेलवर त्याचा मृतदेह आढळुन आला. त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. गणेश मतसागर, शिवनाथ मतसागर, आजीनाथ मतसागर, अतुल मतसागर, किशोर मतसागर यांनी तातडीने त्यास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.