वैजापूर ग्रामीण-1 मध्ये वीज पुरवठा सुरळीत करा -शेतकऱ्यांची मागणी

वैजापूर,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वैजापुर ग्रामीण एक ग्रामपंचायतींच्या हद्दीत मागील दीड महिन्यापासुन अनियमित वीज पुरवठा सूरु आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर बाबुलाल कोतकर, राजेंद्र पेहरकर, उदय गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, श्रीकांत गायकवाड, एकनाथ लोखंडे, राहुल कोतकर, मनोज गायकवाड, किरण गायकवाड, रविन्द्र गायकवाड, रामभाऊ गायकवाड, भिमराव गायकवाड राहुल पवार, पप्पुसिंह राजपूत, गणेश पवार, गुलाब पेहरकर, राहुल कोतकर, जालिंदर गायकवाड, निलेश गायकवाड, गणेश पवार, संतोष गायकवाड, सुरेश गायकवाड, शांतीलाल पवार, फकिरा गायकवाड, शंकर कोतकर, सखाहरी लोखंडे, दिलीप निखाडे, मधुकर गायकवाड, ऋषिकेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.