औरंगाबाद जिल्ह्यात 51 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 513 कोरोनामुक्त, 313 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२८जुलै /प्रतिनिधी  :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 29 जणांना (मनपा 10, ग्रामीण 19) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 513 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 51 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 316 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 490 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 313 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (11) सिडको (1), शिवाजी नगर (1), एन-7 सिडको (1), घाटी परिसर (1), शेंद्रा (1), बीड बायपास परिसर (3), अन्य (3)

ग्रामीण (40) औरंगाबाद (3), गंगापूर (6), कन्नड (3), सिल्लोड (7), वैजापूर (9), पैठण (12)

मृत्यू (01) घाटी (01)1. 75, पुरूष, मानेगाव, वैजापूर