महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 17 जुलै रोजी
912 उमेदवारांना प्रवेश, 138 अधिकारी, कर्मचारी नियुक्त
औरंगाबाद,१३ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील तीन परीक्षा उपकेंद्रावर 17 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य (पेपर क्रमांक -2) परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी 912 उमेदवारांना प्रवेश आहे. परीक्षेसाठी 138 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.
परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवाराने प्रवेशप्रमाणपत्र, स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड,
निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
उमेदवारांना परीक्षा हॉल मध्ये आयोगाच्या वेबसाईटवरुन प्राप्त केलेले प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखीचा पुरावा व त्याची झेरॉक्स प्रत,पारदर्शक पाण्याची बॉटल व सॅनिटायझर या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य, वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन
उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर
उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. मुख्य
दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या
आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल.
उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना तसेच संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वत: चा किमान तीन पदरी मुखपट (MASK) परिधान करणे अनिवार्य आहे. सुधारीत कार्यपद्धतीनूसार परिक्षा सुरु होण्याच्या वेळेच्या अर्धा तास पुर्वीपर्यंत (सकाळी 10.30 वा पर्यंतच) उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेश देण्यात येणार नाही.याची दक्षता घेण्यात यावी, कोणत्याही व्यक्तींना कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाही. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.