जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज जायकवाडी धरणाचे 18 रेडिअल गेट्स टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकूण 9432 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ही आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.

कालपासून जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सध्यस्थीतीतदेखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत एकूण 92.31 टक्के जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत आहे. प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाल्याने आज 18 दरवाजे उघड्ण्यात येत आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने अर्धा फुट उघडून एकुण 9432 क्यूसेस विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.रात्री ८ वाजता धरणाचा उपयुक्त साठा २१३६. ३० दलघमी असून त्याची टक्केवारी ९८. ४० आहे. जायकवाडी धरणातून ७५४५६क्युसेक विसर्ग चालू आहे. सध्या धरणात १लाख ९७६ क्युसेक आवक सुरु आहे.  पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येत आहेत. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावधनता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गोदावरी, दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व कादवा नदीकाठच्या गावक-यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.