अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश कुलकर्णी यांना निरोप

औरंगाबाद,१४फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी दि.१४  संपल्याने त्यांना सरकारी वकील कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला.

या वेळी मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर, सहाय्यक सरकारी वकील उल्हास पवार व इतर सहाय्यक सरकारी वकील उपस्थित होते. या प्रसंगी, ‘आपला कार्यकाळ खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला आणि या काळात सर्व सरकारी वकिलांनी त्यांची प्रकरणे चातुर्याने चालवली’ अशी भावना न्यायाधीश कुलकर्णी यांनी बोलून दाखवली. सहाय्यक सरकारी वकील उल्हास पवार यांनी  आभार मानले.