महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : सीमाप्रश्नी भूमिका स्पष्ट करा!; उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना आवाहन

राज्यकर्त्यांना खडसावण्याचे काम साहित्यिकांनी कोणतीही भीडभाड न बाळगता केले पाहिजे-उद्धव ठाकरे

४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

घनसावंगी , १० डिसेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादामध्ये केंद्र सरकारचा रस्ता कोणता हे आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावे आणि मगच ’ समृद्धी’ महामार्गाचे उद्धाटन करावे, अशी मागणी शिवसेनेचे  पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सीमावाद प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.आर बोम्मई हे अमित शहा यांना भेटून उपयोग होत नाही, असे म्हणत आहेत. ते त्यांच्या नेत्यांना आव्हान देणारी मस्तवाल भाषा बोलत आहेत. ही मुजोरी खपवून घेताना त्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रात येताना पालक म्हणून बोला, राज्याला पालकाची भाजी समजू नका, असे म्हणत टोलावले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक शेषराव मोहिते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार, स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी चोथे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, अनिल परब, विनोद घोसाळकर, खासदार बंडू जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर, ऋषिकेश कांबळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर पदाधिकाऱ्यांचे शिवाजी चोथे, संभाजी चोथे, विनायक चोथे यांनी स्वागत केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी नागपुरात येत आहेत. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून पंतप्रधान आम्हालाही टोमणे मारतील. मात्र, कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांवर जो अत्याचार करत आहे, तेथील मुख्यमंत्री अरेरावी करत आहे, त्यावर पंतप्रधानांनी सणकून बोललेच पाहिजे. कर्नाटकच्या प्रश्नाबाबत आपल्या भूमिकेबाबत अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय.’ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, उद्या नागपुरात पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करतील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतील. पंतप्रधान हे देशाचे पालक असतात, पालक म्हणून त्यांनी जरूर बोलावे, मात्र महाराष्ट्र पालकाची भाजी आहे, असे समजून बोलू नका, असेही त्यांनी सुनावले.

रेडे खोके-खोकेच बोलले असते सध्या महाराष्ट्रात काय चालले हे कुणाचेच कुणाला कळेनासे झाले आहे. उठसूट कुणीही येतो आणि आमच्या दैवतांचा अवमान करणारे भाष्य करताे. एवढी मनमानी करायचीच असेल तर राज्य सरकारने लोकशाही संपली, आम्ही सांगेल तेच होईल असे जाहीर करून टाकावे. संत ज्ञानेश्वर आताच्या काळात नाही. कारण संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात रेड्याच्या तोंडून वेद वदवले, असे म्हटले जाते. मात्र, आजचे रेडे वेगळेच आहेत. ते खोके-खोकेच बोलले असते.

राजा, तू चुकतोय, असे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांना आहे. कारण राजाच्या चुकीमुळे नुकसान राजाचे नव्हे, तर राज्याचे होणार आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांना खडसावण्याचे काम साहित्यिकांनी कोणतीही भीडभाड न बाळगता केले पाहिजे. साहित्यिकांनी देश आणि देशाच्या दशेवर केवळ परिसंवाद न घेता रस्त्यावरही उतरावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

४२ व्या मराठवाडा (घनसावंगी) साहित्य संमेलनाचे उद्घाटक उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे 

आपल जरी युवकांकडे लक्ष दिल नाही तरी युवकांचे लक्ष असत. साहित्य संमेलनाला मी पहिल्यांदाच आलो आहे. हे व्यासपीठ माझे नाही. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. कौतिकराव पाटलांचे कौतुक. शेषराव मोहितेंच्या लिखाणचा संदर्भ साहित्यिक हा माणूसच. आपल्या बुद्धीची मशागत साहित्यिक करतात. सगळी प्रतिभावान माणसे इथे उपस्थित आहेत. मराठवाड्याची भूमी किती प्रतिभावान हे सांगायला नको. ही संतांची भूमी संस्कार, शौर्य दिले. आम्ही संत शिकवणावर चालणारी माणसं. 

वाचेल तो वाचेल. आपण राज्यपालांचा उल्लेख केलात. महापुरूष आमचे आदर्श आहेत. महाराष्ट्राच्या दिशेवर देश चालला आहे. पण कुणी दैवतांवर बोलू नका. जो बोलेले त्याला जाब विचारणारच. मी बोलण्यापेक्षा ऐकायला आलो आहे. काही चुकत असेल तर कान धरा. लक्ष्मीकांत देशमुखांचे परखड विधान आठवले. 

शाळेत धडा होता देश म्हणजे माणसं ते दगड धोंडे नाहीत. ती भारतमाता. जर राज्यकर्ते चुकत असतील तर साहित्यिकांनी चूक दाखवून द्यायला हवी. राजा चुकला तर जनतेचे नुकसान होईल. हिटलरच्या वेळी पण प्रचंड विरोध झाले, छळ झाले. खरी परिस्थिती सांगितली की पुन्हा तुरूंगात जावे लागायचे. आपल्याकडे गुप्त मतदान पण आता तुम्ही दिलेले मत तुम्हाला तरी कळेल का?  कस सुरत गुवाहटी गोवा ही असली लोकशाही आम्ही नाही मानत. मग एकदा जाहीर करा लोकशाही संपली. राजकारण हे वाईट नाही तरुण तरुणींनी राजकारणात या उज्जवल भवितव्यासाठी या. 

सत्ता का हवी तर मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी हवी. निवडून देण्याचा जसा अधिकार आहे तसा परत बोलावण्याचा पण हवा?  खरच देशात लोकशाही आहे का?  सावरकर म्हणाले होते बंदूका हाती घ्या. मी म्हणेन लेखणी हाती घ्या. सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत. कायदामंत्री, उपराष्ट्रपती त्यावर बोलताहेत. पण आम्ही बोललो तर अवमानना व्हायला हवेच पण समान कायदा हवा. न्यायमूर्ती पण पंतप्रधान नेमणार असतील तर काय फायदा.

मधल्या काळात इंग्लंडला महिला पंतप्रधान झाल्या. त्यांनी राजीनामा दिला कारण ठरवलेले धोरण फसल. ४५ दिवसांत नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. आज आपल्या देशात ८ वर्षानंतर सुध्दा नोटबंदीवर कायदेशीर उहापोह सुरु पण जी मनुष्यहानी आर्थिक नुकसान झाले ते झाले. ते आता परत येणार नाही.

आणीबाणी काळात दुर्गाबाई भागवत, करुंदकर होते त्यांचे लिखाण वाचायला हवे, कुरुंदकरांचे फॅसिस्ट वाचणे आवश्यक. कश्याप्रकारे सत्ता चालवतात. हे काम साहित्यिकांकडून व्हायला हवे. ही संतांची भूमी.  निझामाचे अत्याचाराचा संघर्ष केला. पु.ल चा एक किस्सा. नैराश्याचे ढग आले की जीवन वाईट नाही हे साहित्यिकांनी सांगायला हवे. सगळेच प्रवाहपतित होणार असतील तर कठीण. आजोबा साहित्यिक होतेच प्रबोधन सुरु केले, संयुक्त महाराष्ट्रात अग्रेसर, अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी पृर्वा केली नाही. माझे वडील सांगायचे आजोबांबद्दल सांगायचे. तेच काम बाळासाहेबांनी व्यंगचित्र, मार्मिक, सामना काढला. संघर्ष केला. म्हणूनच तो वारसा घेऊन मी पुढे चाललो.

मी आजही तुमच्या कुटुंबातीलच. महाराजांच्या किल्ल्यांचे चित्रण केले, वारीचे दर्शन घडवले. प्रतिभा कोणाला कधी मिळेल सांगता येत नाही. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आयुष्य जाते समजायला. दुसरे वैभव आपली लेणी. तुकोबांना त्रास दिला. चंद्रकांत पाटलांचा समाचार. तुम्ही कोण आम्हाला भिक मागितली शिकवणारे. संत कुठल्या शाळेत शिकले होते. ग्रामीण भागाची माणसे मोठी होतात. ग्रामीण साहित्य फार मोलाचे. चंद्रकांत पाटलांच्या भीकेची आम्हाला गरज नाही. कुसुमाग्रजांची कविता उल्लेख.

उद्या राज्यपालांच्या विधान झाकतील. पंतप्रधान येताहेत. मला त्यांना सांगायचे आहे पालकासारखे बोला. रस्त्यांचे उद्घाटन होईल पण कर्नाटकने जे महाराष्ट्राचे रस्ते बंद केले त्याचे काय? त्यावर पण बोला. बाळासाहेबांची भूमिका ते संयुक्त महाराष्ट्रासाठी तुरूंगात गेले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भाषिक अत्याचार होतो आहे तो त्यांना समजायला हवा. सीमाप्रश्नावर पंतप्रधानांनी बोलावे. महिलेचा अपमान केलेल्या मंत्र्याला अजूनही मंत्रिमंडळात. मी होतो तेव्हा काढून टाकले होते. आज स्वातंत्र्य किती टिकवले किती?  ते टिकवण्याचे काम तुम्ही करायला हवे. वंदेमातरम, चले जाव ह्या दोन शब्दांची ताकद त्याकाळी दिसली. आम्हाला तुम्हाला घडवायचे. तुकाराम महाराजांचा अभंग उल्लेख. आजचे राजकीय दारिद्रय संपवायला हवे ती अपेक्षा तुमच्याकडून.