मराठा समाजाला ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळण्यात अडचणी 

छत्रपती संभाजीनगर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंतरवेली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या 40 दिवसात आरक्षण मिळणे अवघड असल्याचं चित्र आहे. कारण जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची दिलेली मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यात आलेल्या मराठा आरक्षण समितीचा दौरा 23 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे एका दिवसात ही समिती मराठवाड्यातून जमा केलेले पुरावे सरकारकडे कसे सादर करणार? पुराव्यांची पुष्टी कशी करणार? आणि एका दिवसात अहवाल तयार कसा करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.                

अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला होता. पुढे आणखी दहा दिवस जरांगे यांनी सरकारला वाढवून दिले. या 40 दिवसांची मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. विशेष म्हणजे सरकारने नेमलेल्या शिंदे समितीचा याच काळात मराठवाडा दौरा आहे. या समितीचा शेवटचा दौरा 23 ऑक्टोंबरला संपणार आहे. 23 ऑक्टोबरला बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन ही समिती आपला दौरा संपवणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील घेतलेल्या बैठका, लोकांनी दिलेले पुरावे, प्रशासनाने शोधलेले पुरावे या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून तो अहवाल सरकारला सादर केले जाणार आहे. पण हे सर्व एका दिवसांत शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा आदेश निघणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. 

मराठवाड्यातील आंतरवेली सराटी या छोट्या गावावlतील सामान्य कुटुंबातील मनोज जरांगे पाटील या युवकाने १७ दिवस अन्नपाणी सोडून राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत व मराठ्यांच्या वर्तमान व भविष्यातील पिढ्या वाचवण्यासाठी केलेल्या उपोषणास अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान जरांगे पाटील यांनी सुरू ठेवलेल्या साखळी उपोषणास राज्यभरात अनेक जिल्हे तालुक्यात साखळी उपोषणे सुरू झालीत,