एकनाथ शिंदे : ‘कार्यकर्ता मुख्यमंत्री’

नवी मुंबई, २० जुलै /प्रतिनिधी :-  आजची सकाळ उजडली ती  एक दुदैवी  घटना घेऊनच,  दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले.

हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरुन निघाले.तेथे ते आठ वाजता पोहचेले. परिस्थितीची माहिती घेतली. घटना दुदैवी होती. हे लक्षात आले. त्यांनी लगेच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणेला कामाला लावले. आणि काही क्षणात मदतीचे हजारो हात उभे राहीले. मदतकार्य जोरात सुरु होते. दुघर्टनाग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन मुख्यमंत्री करत होते. मदतकार्याने वेग घेतला आणि सकाळी 11.30 च्या सुमारात मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून बाहेर पडला. उपस्थितांना वाटले मुख्यमंत्री मुंबईला परतले म्हणून. परंतु असे सहज परत जातील ते मुख्यमंत्री थोडेच होते. त्यांच्यातला मदतीला धावून जाण्याचा ‘कार्यकर्ता’ या मोठया घटनेतही जागा होता.  रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्या गाडीतून ते पुन्हा घटनास्थळी रेनकोट घालून आले. गडाच्या खाली उपस्थितांना त्याची कल्पना आली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा नव्हता आणि अचानक मुख्यमंत्री घटनास्थळाकडे चालू लागले. ते थेट इरशाळवाडीत पोहोचले.

यावाडीपर्यंत पोहोचण्याचा पायमार्ग साधा नव्हता. धड चालताही येत नाही.अशी बिकटवाट  धड मातीचा नाही  की, दगडांचा. दगड गोटयांमधून येणारे पावसाचे पाणी, समोर भव्य असा कडा. पायवाटेच्या खाली 30 अंशापेक्षा जास्त उताराची तीव्रता. याही अवस्थेत मुख्यमंत्री केवळ दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी चालत होते. आभाळातून जोरदार पाऊस सुरु होता.

घनदाट झाडाझुडपातून वाट काढत दर पंधरा ते वीस मिनिटांनी क्षणभरच थांबत होते.  मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन बचावकार्याचे ‘सारथ्य’ केले.  आभाळातून कोसाळणारा धो-धो पाऊस, खाली निसरडा गाळाने भरलेल्या दगडगोट्यांची वाट, पाय सटकल्यास काय होईल. याची कल्पना असून देखील न डगमगता या ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री सर्व सामान्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी निघाला होता. तब्बल दीड तासाचे अंतर चालून गेल्यावर मुख्यमंत्री पोहोचले त्यांनी प्रत्यक्ष बचावकार्य पाहिले. उपस्थितांना धीर दिला आणि खाली उतरू लागले.

दुर्घटनाग्रस्त जागेवर जाणे जेवढे कठीण होते. त्या जागेवरुन खाली येणे ही मोठी कसरत होती. तरीही मुख्यमंत्री साऱ्या सहकाऱ्यांसोबत दुपारी 4.05 मिनीटांनी खाली आले.

रेनकोट घातलेले ‘कार्यकर्ते मुख्यमंत्री’ तिथे उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनी पाहीले, आणि सारेच त्यांच्या या अशक्य वाटणाऱ्या घटनेबद्दल चर्चा करू लागले. तब्बल अडीच तासानंतर डोंगरमाथ्यावर प्रत्यक्ष घटना घडलेल्या ठिकाणी राज्याचा प्रमुख असूनही सर्वसामान्यांचा दु:खात धावून जाणारा नेता मुख्यमंत्री श्री. शिंदेच होते. “देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे” या विंदा करंदीकर यांच्या कवितेची आठवण या निमित्ताने होते. स्वत:ला सामान्यांचा कार्यकर्ता म्हणून भाषणात न सांगता त्यांनी आज सर्वांसमोर हे सिध्द केले. आज महाराष्ट्राने मुख्यमंत्री ‘कार्यकर्ता’ मुख्यमंत्री होते, पावसातला ‘योध्दा ’होते, व्यवस्थापनातील ‘तज्ञ ’होते, प्रशासनातील जरब असलेले नेता होते, त्याचबरोबर ‘मानवी संवेदना’ जपणारा एक ‘माणूस’ देखील होते. स्वत:ला नेहमीच सामान्य कार्यकर्ता म्हणून संबोधतात त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा सर्वांना आला.

मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! नैसर्गिक आपत्तीने गेलेला माणूस परत आणता येते नाही, परंतु आहे त्या माणसाला मदतीचा हात देण्यासाठी शासन नेहमीच पुढे असते. हे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस घटनास्थळी थांबून साऱ्या राज्यासमोर दाखवून दिले आहे.

इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

 विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले…….

गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचाव कार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले.

विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत: बचाव कार्यात झोकून दिले.

एरवी पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इर्शाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले.

मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो, असे नेहमी मुख्यमंत्री भाषणांमधून सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो..आपत्ती येवो..वैद्यकीय मदत असो सामान्यांच्या मदतीसाठी सदैव ‘ऑन फिल्ड’ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली.. मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून घटनास्थळाकडे निघाले. ते साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले. तेव्हापासून त्यांनी अथकपणे मदत आणि बचाव कार्यासाठी निर्देश दिले.

प्रतिकुल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती हे पाहून सकाळी साडेसात पासून ‘ऑनफिल्ड’ असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे नागरिकांना बाहेर काढले पाहिजे असे ते सोबतच्या मंत्र्यांना देखील सांगत होते. इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सुचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इर्शालगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले…

मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी आणखी वेग घेतला. प्रतिकुल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.

केंद्रिय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसारीतल सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय काय करता येईल ते पहात होते. मदत कार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
एकीकडे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होतांना मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील पिडितांचे अश्रु पुसण्याचे काम केले, त्यांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाला पिडितांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था, निवासाची सोय, भोजन याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.