विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत सुरू झाले आहे. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार उपस्थित नसल्याने विरोधकांच्या आंदोलनातील हवाच निघाली आहे.

दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ‘घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार’ अशा प्रकारचे फलक आमदारांनी दाखवले.