समृद्धी महामार्ग अपघात, राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

मुंबई ,१ जुलै /प्रतिनिधी :- बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागल्याने आणि डिझेलची टाकी फुटून आग पसरल्याने 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरून ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या बसमध्ये 32 प्रवासी बसले होते. त्यापैकी 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बुलढाण्या पोहचले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या महामार्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.