मराठा आरक्षणावर 28 ऑगस्टला पुढील सुनावणी

नवी दिल्ली,
मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा असल्याने, तो 11 सदस्यीय घटनापीठाकडे सोपविला जावा, अशी मागणी आज बुधवारी दोन्ही पक्षकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी करण्याचे निश्चित केले.

महाराष्ट्र सरकारतर्फे प्रख्यात कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी, तर अन्य पक्षकाराच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. दोघांनीही मोठ्या घटनापीठाकडे प्रकरण सोपविण्याची भूमिका घेतली. दरम्यान, पहिल्यांदा युक्तिवाद कोण करणार, यावरून रोहतगी आणि सिब्बल यांच्यात थोडा वाद झाला. महाराष्ट्राच्या वतीने आमची मुख्य याचिका असल्याने, आम्हाला पहिली संधी मिळावी, असे रोहतगी म्हणाले.
 50 टक्के मर्यादेची घटनात्मक तरतूद केंद्राने ओलांडली आहे. इंद्रा सहानी प्रकरणात नऊ न्यायमूर्तींच्या घटनापीठानेही यावर निर्णय दिला होता. त्यामुळे या संदर्भातील प्रश्नांवर करण्यासाठी त्यापेक्षा मोठे घटनापीठ हवे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी काही अपवाद असतील, असे इंद्रा साहनी प्रकरणात म्हटले होते, याकडे रोहतगी यांनी लक्ष वेधले. 28 ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालय यावर आपला निकाल देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *