देशातील अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर रूळावर

82 टक्के सीईओंचे मत
मुंबई, 
देशभरातील 82 टक्के मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अर्थव्यवस्थेविषयी नुकतेच एक दिलासादायक वक्तव्य केले आहे. उत्पादनांच्या मागणीत ऑक्टोबरनंतर सुधारणा होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून असलेल्या मंदीसदृश परिस्थितीवर ही बातमी नक्कीच फुंकर घालणारी म्हणता येईल.
 

अर्थ व उद्योगविषयक विश्लेषण करणार्‍या एका संस्थेने देशातील विविध उद्योगात कार्यरत असणार्‍या सीईओंचे मत एकंदर व्यवसायाच्या हालचालींबाबत व अर्थव्यवस्थेबाबत जाणून घेतले होते. यात बहुतांश सीईओंनी अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर रूळावर येईल असे म्हटले आहे. यात 30 टक्के सीईओंनी येत्या ऑगस्टनंतर भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला सुरुवात होणार असल्याचे म्हटले आहे, तर 60 टक्के सीईओंच्या मते ऑक्टोबरनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल व योग्य दिशेने वाटचाल करू शकेल, असे मत नोंदविले आहे. 10 टक्के सीईओंनी अर्थव्यवस्था महिनाभरातच वेग घेऊ शकणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *