महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय ; हवामान खात्याने केली घोषणा

मुंबई ,२५ जून /प्रतिनिधी :- बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची वाट बघतली जात होती. ‘बिपरयजॉय’ चक्रिवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला होता. आता राज्यात मान्सूनचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य सुखावला आहे. आता हवामान खात्याने एक मोठी घोषणा केली आहे. आज मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

आज मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन दिवसात राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील मान्सून सक्रिया होण्यासाठीचं अनुकूल वातारवण असल्याची माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे. राज्यातील काही भागात सध्या पावसाने तुफान हजेरी लावली असली तरी काही भागात अजून पावासाची प्रतिक्षा कायम आहे.

मुंबई आणि दिल्लीतसुद्धा मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा हमावान विभागाने केली. यावर्षी मुंबईत मान्सूनचे आगमन 14 दिवस उशिराने झालं आहे. तर दिल्लीत मात्र दोन दिवस आधीचं मान्सून दाखल झाला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. काल मुंबईत पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला. या पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकला यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही तासात मुंबई, रायगडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस होऊ शकतो. याशिवाय वारे देखील वेगाने वाहू शकतात.