राजा ठाकूरला सुपारी? राऊतांनी लिहिले  फडणवीसांना पत्र! प्रिय देवेंद्रजी….

मुंबई ,२१ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात राऊतांनी स्वतांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

या पत्रात राऊत लिहताता की, प्रिय देवेंद्रजी, ‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’, असे संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहलेल्या पत्रात म्हणटले आहे. मात्र ही माहिती राऊतांना कशी मिळाली ह्याबाबत राऊतांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या पत्रामुळे राजकीय क्षेत्रात भूंकप होण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांवर मानहानीचा दावा करणार: राजा ठाकुर

image.png
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात गुंड राजा ठाकूरचा उल्लेख केला आहे.

ठाण्यातील, गुंड राजा ठाकुर याला सुपारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा ठाकूरला आपल्यावर हल्ला करण्याची जबाबदारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला. यानंतर आता राजा ठाकुर याने संजय राऊतांवर मानहानीचा दावा करणार असल्याचे स्पष्टच सांगितले.