बाळासाहेब पाहिजेत पण त्यांचा मुलगा नको, आपली पात्रता काय? उद्धव ठाकरे शिंदेंवर भडकले

उद्धव ठाकरेंनी केली पक्ष आणि चिन्हाच्या नव्या पर्यायांची घोषणा

भाजपमध्ये जा, वेगळा पक्ष काढा पण.., उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान

‘निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षितच नव्हता, हा अन्याय’, उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका

मुंबई ,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणाबद्दल दिलेला निर्णय अपेक्षित नव्हता, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात 16 जणांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने दिलेला निकाल धक्कादायक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. उद्धव ठाकरेंनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावरही टीका केली.

पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यामुळे ठाकरे गटासाठी धक्का मानला जात असला तरी उद्धव ठाकरे यांनी आपण लढणार आणि संधीचं सोनं करणार असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधला आहे. भाजपने त्यांचा वापर केला असून आता त्यांचं काम झालं आहे. तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेसमोर या. स्वत: पक्ष काढा, भाजपमध्ये जा पण तुम्हाला प्रत्येकवेळेला ज्या बाळासाहेबांनी जपलं, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको. कारण तुम्हाला शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती गोशाळेत बांधायची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 

बंड करणाऱ्या नेत्यांना काळीज तर आहे, मात्र ते उलट्या काळजाचे आहेत. ते नेते थेट शिवसेना संपवायला निघाले आहेत. बाळासाहेबांचा पुत्र त्यांना मुख्यमंत्रिपदी नको होता. म्हणून त्यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवलं. इथंपर्यंत ठीक होतं, मात्र आता त्यांना तर शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. तुम्हाला आव्हान आहे की, तुमच्यात खरंच हिंमत असेल तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे हे नाव न वापरता मैदानात या आणि निवडणूक लढवून दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“काही काळासाठी आपलं चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. हरकत नाही. खरंतर हा अन्याय आहे. कारण पहिलं सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण आपण दाखल केलं आहे. 16 जणांच्या अपात्रतेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. खरं म्हणजे मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. अनेक घटनातज्ज्ञांनी सांगितलं आहे, घटनेनुसार निकाल लागला तर काय लागणार आहे ते त्यांनीच सांगितलं आहे. उद्या त्यांचे बारा वाजल्यानंतर हा जो गोंधळ घातला गेला आहे तो निस्तारणार कोण? मुळामध्ये तेच जर अपात्र ठरले तर आजचं जे गोठवलंपण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी?”, असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांचे जनतेला केलेले संबोधन त्यांच्याच शब्दांत ​

आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळ देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलय. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथं पर्यंत ठिक होत आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले. सगळ्यांना धन्यवाद दसरा मेळाव्यात विघ्न आणले. पण आपला झालाच. दोन मेळावे झाले अस म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात ते का?  कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात. १९ जून १९६६ तो काळ आजही आठवतो. घरी मराठी माणसांची वर्दळ. मार्मिक होते वाचा आणि थंड बसा हे तेव्हाचे सदर. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले संघटना काढायचे ठरवले का?  आजोबांनी नाव दिले शिवसेना. पुढे हा ५६ वर्षांचा इतिहास आपल्या समोर. एक दिवस एक तगडा माणूस उभा ते दत्ताजी साळवी काही नसतांना लोक जुळत गेली. काहीच नव्हत केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी माझा सिंहाचा खारीचा वाटा उचलणार म्हणून लोक जुळली. वसंतराव मराठे ठाण्यात निवडून आले, अनेक जण अनेकांची नावे. त्यातून शिवसेनेचा विजयरथ पुढे निघाला. पहिल्यांदा ४२ नगरसेवक.

अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष त्यातून शिवसेनेचा महावृक्ष. काल निवडणुक आयोगाने चिन्ह धनुष्य बाण गोठावला. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते गोठवल. या लोकांच्या वृत्तीची चीड. आईच्या काळजात कट्यावर घुसवली. त्यांच्या मागच्या महाशक्तीला जास्त आनंद कारण त्यांना जमल नाही त्यांनी शिवसेनेची लोक फोडून आनंद घेताहेत. या देशात हिंदू म्हणायची हिम्मत दिली तीच शिवसेना गोठावली काय आनंद मिळवलात. तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? माझ्या आजोबांनी नाव दिलय, बाळासहेबांनी रुजवलय. आज अनेकांचे फोन .सकाळी ९-९.३० वाजता नारळ फुटला त्याचे तुषार अंगावर मला ते पाणी इतके भिजवले की अनेक जबाबदारी मी सांभाळल आज शिवसैनिकांच्या अश्रुने भिजलाय.

त्यांचा उद्देश त्यांना तरी समजला. एका जाहिरातीचा संदर्भ.  यांचा उपयोग संपला की यांना फेकून देतील. मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झाल. शिवसैनिकांना दमदाट्या इंदिरा गांधीनी जे केले नाही ते तुम्ही केलय ही बाळासाहेबांची आठवण. तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आज भाजपचे मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करता. शिवसैनिकांना ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना छळताहात. मी डगमगलेलो नाही. माझा आत्मविश्वास आहे तुमच्या सारखे शिवसैनिक आहेत तुम्ही डगमगायचे नाही. अनेकांना फोन येतात. माझ आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे या. तुम्हाला सगळ हवय पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.

काही काळासाठी चिन्ह गोठवलय. मला हा निकाल अनपेक्षित होता. १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री.

आपण तीन चिन्ह दिली आहेत त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधन कार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. आदेशाप्रमाणे चिन्ह नाव दिलय लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे. आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले पण  गद्दारांनी काय दिलय ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे. आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे म्हणून निवडणुक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृक राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला कुणी हरवणार नाही. 

उद्धव ठाकरेंनी केली पक्ष आणि चिन्हाच्या नव्या पर्यायांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव गोठविल्यानंतर आता नव्या नावाची घोषणा केली आहे. “त्रिशूळ, उगविता सुर्य आणि धगधगती मशाल!”, असे पर्याय ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी चिन्ह म्हणून पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच पक्ष म्हणून फक्त शिवसेना हे नाव आता कुठल्याही गटाला लावता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गटातर्फे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशी नावे देण्यात आले आहेत.