कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिरडा येथील बाधित शेती पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद

हिंगोली,२५ मार्च  / प्रतिनिधी :-  हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीपिंकाचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी  हिंगोली तालुक्यातील मौजे  भिरडा शिवारातील किशोर मास्ट  यांच्या शेतातील गारपीट व अवकाळी  पावसामुळे नुकसान झालेल्या ऊस, फुलकोबी, आंबा या पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी  किशोर मास्ट व उपस्थित शेतकरी, अधिकारी यांच्याशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. तसेच या संकटाच्या काळात राज्‍य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तातडीने शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन मदत देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले .

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, तालुका कृषि अधिकारी कमलाकर सांगळे, सरपंच संघपाल जाधव, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषि सहायक, शेतकरी आदी उपस्थित होते.