हर्षवर्धन जाधव यांचा जामीन रद्द करावा शासनाच्या वतीने खंडपीठात अर्ज

औरंगाबाद, दिनांक 22 :मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन नेऊन पाेलिसाला मारहाण केल्याप्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर सुटलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा संबंधित जामीन रद्द करावा, यासाठी शासनाच्या वतीने साेमवारी आैरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करणयात आला. सुनावणीदरम्यान न्या. मंगेश पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांना नाेटीस बजावली असून पुढील सुनावणी दाेन आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे. 

शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जानुसार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाेलिसाला मारहाण केल्याप्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला हाेता. मात्र, जाधव यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य घडले आहेत. त्याआधारे जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून यासंदर्भातील नाेटिसीत जामीन का रद्द करू नये, असे म्हटले आहे. काय आहे मूळ प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घातल्यानंतर पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्ह व सत्र न्यायधीश आर. आर. काकाणी यांनी दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण हे 5 जानेवारी 2011 रोजी वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरुळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केलेला होता. त्यावेळी विरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे हे खुलताबाद इदगाह टी पाईंटजवळ वाहतून नियमन करत होते. मुख्यमंत्री वेरुळ लेणी पाहून पर्यटन केंद्राकडे निघाल्याने टी पाईंटजवळ वाहतूक थांबवण्यात आलेली होती. दरम्यान औरंगाबाकडून एक फॉर्च्युनर गाडी आली. ही गाडी स्वत: आमदार हर्षवर्धन जाधव चालवत होते. गाडीमध्ये तत्कालीन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील बनकर व वाहन चालक संतोष जाधव हे बसलेले होते. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार जाधव यांनी न थांबता सहाय्यक पोलिस निरिक्षक कोकणे यांच्या अंगावर गाडी घातली, मात्र प्रसंगावधान राखत कोकणे यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन जिव वाचवला. त्यानंतर सुसाट वेगाने आमदार जाधव हे वेरुळच्या दिशेने निघाले, कोकणे यांनी तातडीने वायरलेसवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, व त्यांचा पाठलाग सुरु केला. पुढे वेरुळ लेणीसमोरील महाविर स्तंभाजवळ दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आमदाजार जाधव यांची गाडी अडवली, पाठलाग करणारे सहाय्यक निरिक्षक कोकणे हेही लगेचच त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी गाडीतून उतरत आमदार जाधव यांनी मी आमदार आहे, ओळखत नाही, काय असे म्हणत शिवीगाळ करत सहाय्यक निरिक्षक कोकणे यांना मरहाण केली, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी कोकणे यांच्या तक्रारीवरुन खुलताबाद पोलिस ठाण्यात शासकीय कामाक अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्याला जखमी करणे, गंभीर जखमी करणे, विनयभंग करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी तपास करुन 10 मार्च 2011 रोजी न्यायालात दोषारोपपत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागुल यांनी नऊ जणांच्या साक्ष नोंदवल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने आमादार जाधव यांना दोषी धरुन कलम 252 न्वये एक वर्ष सक्तमजूरी व कलम 323 न्वये एक वर्ष सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत. न्यायालयाने दिलीप पाटील बनकर व संतोष जाधव यांना निर्दोष मुक्त केले. शिक्षा सुनावल्यानंतर आमदार जाधव यांनी तात्काळ दंडाची दहा हजाराची रक्कम भरली, त्यानंतर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी म्हणून शिक्षेला एक महिन्याची स्थगिती दिली आहे.