औरंगाबाद जिल्ह्यात 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, दिनांक 31 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 34 जणांना (मनपा 23, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45642 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46987 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1238 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 107 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (26)चिकलठाणा (1), उल्कानगरी (1), साई पार्क, एन सात सिडको (1), एन नऊ एम दोन (1), संत ज्ञानेश्वर नगर, हडको (3), गारखेडा परिसर (3), जय भवानी नगर (2), भावसिंगपुरा (1), छावणी (1), बजरंग चौक (1), सूतगिरणी चौक (1), आकाशवाणी परिसर (1), अन्य (9)

ग्रामीण (7)अन्य (07)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत बजरंग चौकातील 63 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.