औरंगाबाद जिल्ह्यात 45608 कोरोनामुक्त, 109 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 30: औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 जणांना (मनपा 21, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45608 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46954 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1237 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 109 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (21)कैलास नगर (1), सातारा परिसर (1), प्रिया कॉलनी, पडेगाव (1), गारखेडा (4), सिद्धी कॉलनी (1), उल्का नगरी (1), एन सात, आयोध्या नगर (1), पिसादेवी (1), एसआरपीएफ कॅम्प (1), विठ्ठल नगर, देवळाई (1), अन्य (5), साक्षी नगरी (1), एसबी कॉलनी (1), वेदांत नगर (1)

ग्रामीण (9)पोखरी (1), अन्य (8)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत राम नगर येथील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.