औरंगाबाद जिल्ह्यात 44 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,एक मृत्यू

जिल्ह्यात 45565 कोरोनामुक्त, 91 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 55 जणांना (मनपा 47,ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45565 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेआहेत. आज एकूण 44 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 46892 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1236 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 91 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचातपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (37)ईटखेडा (1), मनपा परिसर (1), वेदांत नगर (1), पद्मपूरा (1), एस.बी.कॉलनी (1), जाधवमंडी (2), सातारा परिसर (1), बजाज नगर (1), एन-11 (1), होनाजी नगर (1), भगतसिंग नगर (1), विश्रांती नगर (1), म्हसोबा नगर (2), पिसादेवी (1), आयोध्दा नगर (1), एन-9 (1), मिल्ट्रि हॉस्पिटल (1), अन्य (18),

ग्रामीण (7) वरुड काझी (3), स्वामी विवेकानंद नगर फुलंब्री (1), बजाजनगर (1), साईनगर नगर रोड (1), अन्य (1)

एक कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात कुशलनगरातील 88 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.