९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

नाशिक : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ संशोधक, विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. यावर्षी हे संमेलन नाशिक येथे होणार असून कोविडच्या काळामध्ये सर्व नियम आणि अटींचे पालन करून हे पार पाडण्याचा उद्देश आहे. यावेळी साहित्यिक भारत सासणे यांचेदेखील नाव चर्चेत होते. मात्र, साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चालल्या बैठकीत जयंत नारळीकर यांच्या नावावर एक मत झाल्याची माहिती देण्यात आली.
 
 
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे. बाल वाचकांमध्ये विज्ञान कथांची गोडी निर्माण करणारा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘गणितातील गमती जमती’ अशी अनेक बालसाहित्य त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय त्यांना ‘पद्मभूषण’ (१९६५), ‘पद्मविभूषण’ (२००४) आणि ‘महाराष्ट्र भूषण’ (२०१०) अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.  

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  व साहित्यिक  डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटन संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज(रविवार) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती.

या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे व जनार्दन वाघमारे ही नावं चर्चेत होती. अखेर डॉ. जयंत नारळीकर यांचं नाव निश्चित झालं आहे.

हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले होते. या वर्षी सार्वजनिक वाचनालय इच्छुक नसल्याचे कळल्यावर लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीतील मराठी जनांना मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून सरहद्द संस्थेने मागील वर्षी आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली होती. किमान यंदातरी आपला विचार होईल असे दिल्लीकरांना वाटत होते. संमेलन नाशिकला मिळतेय हे समजल्यावर सरहद्द संस्थेने महामंडळाला प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठविले होते. अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब के ले.