औरंगाबाद जिल्ह्यात 45286 कोरोनामुक्त, 185 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 22 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 66 जणांना (मनपा 56, ग्रामीण 10 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45286 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46701 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1230 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (32)न्यू शांती निकेतन कॉलनी (1), एस आर पी एफ कॅम्प, सातारा परिसर (2), श्रीकृष्ण नगर, सुंदरवाडी (1), चिकलठाणा (2), ब्रिजवाडी (1),रामनगर (1), प्रताप नगर (1),एम-2 सिडको (2), धुत हॉस्पिटल परिसर (1), बिजली नगर (1),विजय नगर (1), हडको (1),मुकुंदवाडी (1), कल्पतरु हौ. सो. (1),श्रीपाद कॉलनी (2),अन्य (13)

ग्रामीण (2)अन्य (2)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.