औरंगाबाद जिल्ह्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 45148 कोरोनामुक्त, 249 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 20 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 55 जणांना (मनपा 50, ग्रामीण 05) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45148 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 58 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46625 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1228 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 249 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (50)नारेगाव (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), एन-7 सिडको (1), गारखेडा परिसर (2), प्रताप नगर (1), उत्तरा नगरी (1), एन -4 सिडको (1), एन-3 सिडको (1), सुरेवाडी हर्सुल, पिसादेवी (1), घाटी परिसर (1), हर्सुल (1), एन दोन राम नगर (1), पूजा पार्क, पडेगाव (2), छावणी परिसर (1), अन्य (34)

ग्रामीण (8)आडगाव (2), अन्य (6)