औरंगाबाद जिल्ह्यात 45093 कोरोनामुक्त,246 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 19 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 52 जणांना (मनपा 46, ग्रामीण 06) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 45093 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 39 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46567 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1228 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 246 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

मनपा (36) गारखेडा परिसर  (3), अनुपमा हौसिंग सोसायटी, उस्मानपुरा (3), हर्सुल (1), साईनाथ नगर (1), खाराकुआँ (1), देवानगरी (3), दिशानगरी (2), गादिया विहार (1), रेणुका माता मंदिर (1), रामगोपाल नगर(1), सम्राट नगर (1), दशमेश नगर (2), एमजीएम परिसर (1), बीड बायपास (3), अन्य (12)

ग्रामीण (3) फुलंब्री (1), अन्य (2)
एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.