औरंगाबाद जिल्ह्यात 44932 कोरोनामुक्त, 303 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 जणांना (मनपा 46, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46459 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 25 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46459 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1224 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 303 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (18)श्रेय नगर (1), व्यंकटेश नगर (1), एन-3 सिडको (1), एन-6 सिडको (1), संत ज्ञानेश्वर नगर (1), भगतसिंग नगर (1), प्रकाश नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), जयभवानी नगर (1), हडको (1), अन्य (08)

ग्रामीण (07)अन्य (07)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत मयुर पार्क येथील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.