औरंगाबाद जिल्ह्यात 44823 कोरोनामुक्त, 353 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 14 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 जणांना (मनपा 45, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44823 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 48 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46398 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1222 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 353 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (38)सातारा परिसर (2), कांचनवाडी (1), अरुणोदय कॉलनी (1), एसटी कॉलनी (1), मयूर पार्क (1), एन चार सिडको (1), एन तीन सिडको (1), सरस्वती नगर (1), रोजाबाग (1), भूषण नगर (1), अन्य (27)

ग्रामीण (10)रांजणगाव (2), बजाज नगर (2), सिडको महानगर (1), अन्य (5)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत म्हाडा कॉलनी, वाळूज येथील 45 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.