औरंगाबाद जिल्ह्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,पाच मृत्यू

जिल्ह्यात 43943 कोरोनामुक्त, 456 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 31 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 68 जणांना (मनपा 57, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43943 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 60 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45604 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1205 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 456 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (49)व्यंकटेश कॉलनी (1), रॉक्सी सिनेमा गृहाजवळ (1), संगीता कॉलनी (1), एन वन सिडको (3), एन सहा, सिंहगड कॉलनी (2), कांचनवाडी (1), एन सात सिडको (1), कैलास नगर (1), एन तीन सिडको (1), एन चार सिडको (2), भगवती कॉलनी (1), एमजीएम परिसर (1), बीड बायपास (1), एन नऊ, हडको पवन नगर (1), भावसिंगपुरा (2), मिश्रा कॉलनी (1), स्टेपिंग स्टोन शाळा परिसर (1),सूतगिरणी चौक (1), दिल्ली गेट (3), तोरण गड नगर (1), बन्सीलाल नगर (1), ग्लोरिया सिटी पडेगाव (1), जीडीसी हॉस्टेल परिसर (1), आकाशवाणी परिसर (1), शेंद्रा, एमआयडीसी (1), नक्षत्रवाडी (1), अन्य (16)

ग्रामीण (11)बायपास रोड, सिल्लोड (1), वाळूज महानगर (1), वरूड बु. (1), अन्य (8)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रेणुका माता मंदिर परिसर, बीड बायपास येथील 88 वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटर रोड, गणेश कॉलनीतील 63 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात विमानतळ परिसरातील 66 वर्षीय पुरूष, दर्गा रोड परिसरातील 81 वर्षीय पुरूष आणि रेल्वे स्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनीतील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.